June 2, 2025

जालना दौऱ्यात किरीट सोमय्यांचा दावा: एका महिन्यात मुंबई आणि दोन महिन्यात महाराष्ट्र भोंगे मुक्त होणार

जालना | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जालना दौऱ्यात एका महिन्यात मुंबई आणि दोन महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र भोंगे मुक्त करण्याचा दृष्टीकोन मांडला आहे. सोमय्या यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोगस जन्म प्रमाणपत्रांच्या प्रकरणावर बैठक घेतली आणि त्यावर सखोल चर्चा केली.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात नायब तहसीलदारांनी 1760 खोटे जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा उल्लेख करत, जिल्ह्यातील 3,595 जन्म प्रमाणपत्रे परत घेतली जाणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. याशिवाय, इतर तहसीलदारांनी जारी केलेल्या जन्म प्रमाणपत्रांचीही चौकशी सुरू आहे.

मुंबईमध्ये आतापर्यंत 60 टक्के बेकायदेशीर भोंगे उतरवण्यात आल्या असून, एका महिन्यात मुंबई आणि दोन महिन्यांत संपूर्ण महाराष्ट्र भोंगे मुक्त होण्याचे उद्दिष्ट आहे. किरीट सोमय्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांचे भोंगे वाजत असतानाही राज्यातील बेकायदेशीर मशिदींवर कोणत्याही प्रकारचा भोंगा वाजू दिला जाणार नाही, असा ठाम इशारा दिला.

ही कारवाई राज्यातील बेकायदेशीर भोंग्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रशासनात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाची पावले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.