राहुरी (प्रतिनिधी): नगर–मनमाड महामार्गावर पेट्रोलपंपाजवळ गुरुवारी मध्यरात्री साडेअकरा वाजता भीषण अपघात घडला. या अपघातात ट्रक पलटी होऊन त्याला भीषण आग लागली. या घटनेत ट्रकमधील सगळा माल जळून खाक झाला असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
सदर मालवाहू ट्रक नगरकडून मनमाडच्या दिशेने जात होता. दरम्यान, राहुरी फॅक्टरी परिसरात असलेल्या पेट्रोलपंपाजवळ ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाला. पलटी होताच जोरदार स्फोट झाला आणि क्षणात ट्रकने पेट घेतला.
स्थानिकांनी धाव घेऊन अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच राहुरी आणि अहमदनगर येथून अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, तोपर्यंत ट्रकमधील सामान जळून खाक झालं.
या घटनेत ट्रकचालक आणि क्लिनर सुखरूप असून, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आग विझवण्यासाठी जवळपास एक तास लागला. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार वाहनाच्या तांत्रिक बिघाडामुळे अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
https://msrdc.org -Maharashtra Highway Authority
More Stories
अहिल्यानगर लग्न आचारसंहिता: मराठा समाजाने स्थापन केली सुचना समिती
हुंडा प्रथा बंदी मराठा समाजाचा ऐतिहासिक निर्णय
सिंहस्थ कुंभमेळा 2026: नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये अमृतस्नानाच्या तारखा जाहीर