अंध्र प्रदेशमधील ३,२०० कोटी रुपयांच्या मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या के. राजशेखर रेड्डी यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. शुक्रवारी दिलेल्या निर्णयात न्यायालयाने सांगितले की, रेड्डी यांनी दाखल केलेला अटक बेकायदेशीर असल्याचा दावा ग्राह्य धरता येत नाही. याऐवजी त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज करावा, असा सल्ला दिला.
२०१९ ते २०२४ या काळात के. राजशेखर रेड्डी आणि त्यांच्या गटाने मद्य वितरण प्रणालीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचे SIT च्या तपासात समोर आले आहे. SIT च्या अहवालानुसार, त्यांनी काही प्रसिद्ध ब्रँड्स हटवून विशिष्ट ब्रँड्सना प्रोत्साहन दिले आणि प्रत्येक केसमागे किकबॅक घेतले. या कृत्यांमुळे राज्य सरकारला सुमारे ३,२०० कोटींचा आर्थिक तोटा झाला आहे, तर काही प्रभावशाली लोकांना फायदा झाला आहे.
या घोटाळ्यामुळे मद्य उद्योगातील पारदर्शकता व विश्वासार्हता धोक्यात आली असून, राज्यात मोठी राजकीय आणि आर्थिक चर्चा निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे रेड्डी यांच्यासाठी कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
More Stories
अल्पवयीन मुलीवर अत्याचार: शेवगावमध्ये आरोपीस १० वर्षांची शिक्षा
हुंडा प्रथा बंदी मराठा समाजाचा ऐतिहासिक निर्णय
ओडिशा लैंगिक अत्याचार १३ वर्षीय मुलीवर – आत्महत्येचा प्रयत्न!