शिंदे ठाकरे युती ही सध्या महाराष्ट्रात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी युतीसाठी हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे. या राजकीय डावपेचामुळे मुंबईतील निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
युतीची ही समीकरणं केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणाच्या भविष्यावर परिणाम करू शकतात. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची युती प्रत्यक्षात आली, तर मनसेच्या मराठी मतांवर पकड असलेल्या भागांमध्ये ती निर्णायक ठरू शकते. अनेक वर्षांपासून मनसेचे राजकीय अस्तित्व झपाट्याने कमी होत असतानाही, काही विशिष्ट विभागांमध्ये त्यांच्या समर्थकांची संख्या अजूनही निर्णायक ठरते. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंना राज ठाकरे यांची साथ मिळाली, तर आगामी महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना गटाला निर्णायक विजय मिळवता येऊ शकतो.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे गटासाठी ही युती अस्तित्वाचा प्रश्न आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये पक्षाला मोठा फटका बसल्यामुळे त्यांना पुन्हा आपली ताकद सिद्ध करावी लागणार आहे. यासाठी त्यांना राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्याची साथ मिळणे अत्यंत महत्त्वाचं ठरेल. अशा स्थितीत शिंदे गट आणि मनसे यांचं राजकीय समीकरण उद्धव गटाच्या योजनांवर पाणी फेरणारे ठरू शकते. या राजकीय चढाओढीत प्रत्येक हालचाल काळजीपूर्वक आखली जात आहे. पुढील काही आठवडे हे निश्चित करतील की, ही युती प्रत्यक्षात येईल की, महाराष्ट्रात आणखी एक वेगळी राजकीय समीकरणं उदयास येतील.
सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ही युती चर्चेचा प्रमुख विषय बनली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये लवकरच होणाऱ्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष आपली रणनीती ठरवत आहेत. भाजपसह मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखालील गट आणि मनसे यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. याचवेळी उद्धव ठाकरे गटानेही मनसेला सोबत घेण्याची चाचपणी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत हे समीकरण राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठरणार आहे.
मुंबई महानगरपालिका ही राजकीय प्रतिष्ठेचा केंद्रबिंदू आहे. शिवसेनेने अनेक वर्षे येथे सत्ता गाजवली, परंतु पक्षातील फूट, मतविभाजन आणि नव्या राजकीय संधींमुळे सत्ता कोणाच्या हाती येईल हे निश्चित नाही. मनसेला सोबत घेतल्यास मराठी मतांवर प्रभाव टाकता येऊ शकतो, याची कल्पना सर्वच गटांना आहे. त्यामुळेच ही युती भाजपसाठी देखील फायदेशीर ठरू शकते.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज ठाकरे यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण देण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्लान आहे आणि मंत्री उदय सामंत यात प्रमुख भूमिका बजावत आहेत. जर हे नवे समीकरण वास्तवात आले, तर ते उद्धव ठाकरे गटाच्या समीकरणांवर थेट परिणाम करणारे ठरू शकते. या राजकीय हलचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक ठरत आहे, कारण यामधून आगामी महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपर्यंत पोहोचणारे संकेत मिळू शकतात.
