तिसऱ्या क्रमांकाच्या दिशेने भारताची वाटचाल…
1950 पासून आजतागायत भारताने अनेक संकटांचा सामना करत आर्थिकदृष्ट्या उल्लेखनीय प्रगती साधली आहे. ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेतीवर आधारित होती. मात्र गेल्या काही दशकांपासून भारताने उत्पादन, सेवा, आणि आयटी क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली आहे.
सध्या भारताची GDP सुमारे 3.7 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली आहे आणि येत्या काही वर्षांत ती 5 ट्रिलियन डॉलरच्या घरात जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी भारत लवकरच तिसऱ्या क्रमांकाच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या यादीत स्थान मिळवू शकतो.
विशेषतः चीनमधील गुंतवणूकदारांचा भारताकडे झुकणारा कल, अमेरिका-युरोपमध्ये भारताच्या IT आणि फार्मा क्षेत्रातील वाढती मागणी, यामुळे आर्थिक वाढीला चालना मिळत आहे. भारत आता केवळ ‘उद्योगस्नेही’ देश नाही, तर आर्थिकदृष्ट्या आश्वासक बाजार म्हणूनही उभा राहत आहे.
रोजगारनिर्मिती, उत्पादन क्षमता, स्टार्टअप यशोगाथा, डिजिटलायझेशन, आणि पायाभूत सुविधांवरील भर यामुळे भारत जगात नेतृत्व करणारा देश बनण्याच्या वाटेवर आहे. 2025 पर्यंत भारत 4 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होऊ शकतो.
