कोविड १९ भारत २०२५:
भारतामध्ये पुन्हा एकदा कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. ३१ मे रोजी देशातील एकूण कोविड रुग्णसंख्या ३,३९५ वर पोहोचली आहे. त्याच दिवशी ६८५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत देशात २६ मृत्यू झाले आहेत. यामध्ये काल (३१ मे) रोजी दिल्ली, कर्नाटका, केरळ व उत्तर प्रदेशमध्ये चार नवीन मृत्यू समोर आले.
NB.1.8.1 आणि LF.7 हे नवे वेरिएंट अत्यंत वेगाने संसर्ग पसरवणारे असून, ज्यांना आधीपासून आरोग्यविषयक समस्या आहेत, त्यांच्यासाठी हे विशेषतः घातक ठरत आहेत.
केरळ सर्वाधिक प्रभावित राज्य:
केरळमध्ये एकूण १,३३६ रुग्ण आहेत आणि २४ तासांत १८९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यानंतर महाराष्ट्र (४६७ रुग्ण) आणि दिल्ली (३७५) आहेत. गुजरात (२३४), तामिळनाडू (१८५), उत्तर प्रदेश (११७), कर्नाटका व पश्चिम बंगालमध्येही वाढ दिसून आली आहे. मात्र सिक्कीममध्ये एकही केस नोंदलेली नाही.
आरोग्य विभाग सतर्क:
आरोग्य अधिकाऱ्यांनी जनतेला घाबरू नये असे आवाहन केले आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये RT-PCR टेस्टसाठी सुविधा उपलब्ध असून, खाजगी क्षेत्रात रॅपिड अँटीजेन चाचण्या अधिक केल्या जात आहेत. तसेच, गंभीर लक्षणे – नाक बंद होणे, मळमळ, पोटदुखी आणि घशातील वेदना याकडे लक्ष ठेवावे, आणि चार दिवसांपेक्षा अधिक काळ राहिल्यास RT-PCR चाचणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
https://www.who.int/emergencies/diseases/novel-coronavirus-2019
