पुणे (प्रतिनिधी) – हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार, २०२५ मध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच ११० टक्के पावसाची शक्यता आहे. ही शक्यता विविध घटकांच्या अभ्यासावर आधारित आहे, ज्यात तापमान, आर्द्रता, वाऱ्याची दिशा आणि समुद्रातील बदल यांचा समावेश आहे.
जुलै महिना सर्वाधिक दमदार ठरणार असून, काही दिवस अतिपावसाचे असतील. या काळात शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून शेतीची कामे हाती घ्यावीत, असे आवाहन डॉ. रामचंद्र साबळे यांनी केले आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, कोल्हापूर, नाशिक, पुणे, नागपूर, सातारा आणि औरंगाबाद या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता अधिक आहे. काही ठिकाणी गारपीट आणि विजेच्या कडकडाटासह पावसाचे दिवसही येऊ शकतात.
राज्यभरात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज असलेले जिल्हे: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पुणे, कोल्हापूर.
https://mausam.imd.gov.in – हवामान खाते
