पुणे:
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मागील काही वर्षांत शेततळ्याच्या योजनांच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी होत होती. त्यानुसार, आता शेततळ्याच्या अनुदानाची रक्कम ७५ हजार रुपयांवरून थेट १ लाख रुपये करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या सूचनांनुसार देण्यात आली आहे.
एका कार्यक्रमात अजित पवार यांनी सांगितले की, आधुनिक आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीपूरक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ही वाढ करण्यात आली आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी आणि संबंधित विभागांनी ही योजना प्रभावीपणे राबवावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
याशिवाय, विविध शेतीपूरक योजनांसाठी देखील शेतकऱ्यांना अनुदाने मिळावीत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. भविष्यात कृषी विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात माहिती व तांत्रिक सहाय्य पुरवले जाणार आहे.
More Stories
अहिल्यानगर लग्न आचारसंहिता: मराठा समाजाने स्थापन केली सुचना समिती
हुंडा प्रथा बंदी मराठा समाजाचा ऐतिहासिक निर्णय
सिंहस्थ कुंभमेळा 2026: नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये अमृतस्नानाच्या तारखा जाहीर